ही युवाशक्तीच लातूरचं भाग्य बदलेलं!
गेल्या ८ दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात जल साक्षरता निर्माण करणाऱ्या ‘जल साक्षरता रॅली’चा हजारो युवकांच्या उपस्थितीत लातूर शहरातील प्रवास सुरु झाला आहे. हजारो विद्यार्थ्यांनी यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मानवी साखळी करून आणि टाळ्यांच्या गजरात या रॅलीचे स्वागत करत लातूरच्या विकासाला आपला सक्रीय पाठींबा दर्शवला.
आपल्या रॅलीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात युवाशक्ती जागृत होणे, हे नक्कीच आपल्या सर्वांसाठी नवचैतन्य देणारा आणि स्फूर्तिदायक क्षण आहे.


