८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा शुभारंभ

८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा शुभारंभ : त्यांच्या स्वप्नांना नवे बळ देण्याचा एक प्रयत्न !
केंद्राच्या सामाजिक न्याय मंत्रालय व‌ जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करण्यात आलेल्या ८,७९७ दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात ३० दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले. इतर नोंदणीकृत सदस्यांना घरपोच साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला व्हर्चुअल कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री.थावरचंदजी गहलोत, महाराष्ट्राचे सामाजिक व न्याय मंत्री श्री.धनंजयजी मुंडे यांची उपस्थिती होती.
त्याप्रसंगी पर्यावरण राज्यमंत्री श्री.संजयजी बनसोडे, खासदार श्री.सुधाकरजी शृंगारे, जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेशअप्पाजी कराड, संवेदनाचे श्री.सुरेशजी पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई साळुंखे, समाज कल्याण सभापती श्री.रोहिदासजी वाघमारे, जिल्हाधिकारी श्री.जी.श्रीकांत, जिल्हा परिषद सीईओ श्री.संतोषजी जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.हिम्मतजी जाधव आदींची उपस्थिती होती.
तीन वर्षांपूर्वी पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना ही संकल्पना संवेदनाचे श्री.सुरेशजी पाटील यांनी मांडली होती. या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण ३ डिसेंबर २०१७ पासून कार्य सुरू केले होते. पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा प्रवाह पोहोचावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. दिव्यांग बांधवांनाही सक्षम करून त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा पद्धतीच्या योजना सुरू केल्या आहेत.
या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी काम करण्याचे भाग्य मला मिळाल्याबद्दल विशेष समाधान वाटते आहे. एकट्या लातूर जिल्ह्यातील ८,७९७ दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप होणार असून एका जिल्ह्यात एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविणार देशातील हा पहिलाच जिल्हा ठरणार आहे.
‘प्रत्येक दिव्यांग बांधवाचे सशक्तिकरण व्हावे’ हे स्वप्न आमचे तीर्थरूप स्व.दिलीपरावजी पाटील निलंगेकर यांनी पाहिले होते. त्यासाठी त्यांनी कार्यही सुरू केले. त्यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आमच्या मातोश्री (अक्का) माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांनी “अक्का फाउंडेशन”च्या माध्यमातून आजवर अनेक दिव्यांग बांधवांना उभे करण्यासाठी कार्य केले आहे.
या निमित्ताने आमच्या तीर्थरूपांनी त्या काळात पाहिलेले स्वप्न आता पूर्णत्वास जाणार आहे, ही बाब आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे.